'धर्मासाठी जागे व्हा, जेव्हा ताकद दाखवायची वेळ येईल तेव्हा बाहेर पडा' - निलेश राणे !!
सिंधुदुर्ग : छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू बुद्रुक समाधी स्थळावरून ''धर्मवीर ज्वाला'' सिंधुदुर्ग जिल्ह्यात निलेश राणे यांच्या मतदारसंघात कुडाळ येथे आली होती. या कार्यक्रमामध्ये निलेश राणेंनी छत्रपती संभाजी राजे यांना अभिवादन करत त्यांनी हिंदू धर्माची परंपरा, शंभूराजांनी धर्मासाठी दिलेलं बलिदान, केलेला त्याग याविषयी भाष्य केलं. राणे पुढे म्हणाले की, आपण कधी धर्मासाठी जागे होणार? केवळ एक दिवस अभिवादन करून होणार नाही, धर्म तेव्हाही संकटात होता, आजही संकटात आहे. चारही बाजूंनी धर्माला घेरले जातंय. आपल्याकडे केवळ एक देश आहे, फक्त एका मुसलमानांकडे किती देश असतील आणि म्हणून आपण आजूबाजूच्या लोकांना जर संरक्षण देऊ शकलो नाही, तर बाहेरून कोणी आपल्याला संरक्षण देण्यासाठी येणार नाही. म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करतो जेव्हा ताकद दाखवायची वेळ येईल, तेव्हा ताकद दाखवायला बाहेर पडा आणि ताकद दाखवायची वेळ सुद्धा येणार लवकर हे कोणीही विसरू नका.ही रॅली फक्त एक दिवस करून होणार नाही. आपण छत्रपती संभाजी महाराज यांना अभिप्रेत आहे असे वागतो का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. छत्रपती संभाजी महाराजांनी जीव कशासाठी दिला, कोणासाठी दिला, तसं आपण जगतोय का? धर्म बदलायचा नाही म्हणून स्वतःचा जीव या माणसाने दिला आणि आपण आज किरकोळ गोष्टींसाठी कुठेतरी कोणाला पोसतोय, कुठल्या अवलादी आपण महाराष्ट्रात पोसतोय याचा कधीतरी विचार करा, असे खडे बोल राणे यांनी सुनावले आहेत.
आता तीच परिस्थिती आली आहे. जेव्हा महाराजांना आपल्या नावडीच्या काठावरून नेत होते तेव्हा समाज जसा बेसावध होता, तसा आजही समाज बेसावध आहे. तुम्ही जर नाही उठलात तर हे घरात घुसतील लक्षात ठेवा. एक दिवस एक रॅली काढून होणार आहे का? एक दिवस गोमांसाची गाडी पकडून होणार आहे का? यावेळी त्यांनी रमा नाईक या हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव घेत हा माणूस कायम धर्मासाठी जगतो, एक रमा नाईक धर्मासाठी टोकाला जातो, तर आपण येथे किती जमलो आहोत असं सांगत रमा नाईक यांच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. आज आपण येथे जमलो आहोत तसे आपण पोलीस स्टेशनमध्ये का नाही जमत? असाही सवाल निलेश राणे यांनी यावेळी उपस्थित केला.
What's Your Reaction?








