विराट कोहली आणि सॅम कोंटास यांच्यात वाद ; विराट कोहलीला दंडही ठोठावण्यात आला !!
मेलबर्न : विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर सॅम कोंटास यांच्यात मैदानात जोरदार वाद झाला होता. त्यानंतर विराट कोहलीला दंडही ठोठावण्यात आला होता. पण विराट कोहलीला दंड ठोठावल्यावर आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. एका गोष्टीने या सर्व प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
विराट आणि कोंटास यांच्यात मैदानात नेमकं काय घडलं....
सॅम कोंटास हा खेळपट्टीवर बऱ्याचदा धावत जात होता. त्यामुळे त्याला विराटने काही वेळा हटकले होते. पण सॅम मात्र काही ऐकत नव्हता. त्याच्याकडून ही चूक पुन्हा पुन्हा घडत होती. जेव्हा षटक संपले तेव्हा विराट आणि कोंटास समोरासमोर आले होते. त्यावेळी विराट कोहलीचा कोंटासला धक्का लागला. त्यानंतर विराट कोहली तिथेच थांबला आणि कोंटासशी तो काही तरी बोलत होता. विराटची देहबोली आक्रमक होती. त्यामुळे पंचांनी लगेच तिथे धाव घेतली आणि प्रकरण हाताबाहेर जाऊ दिले नाही.
विराद कोहलीला किती दंड झाला....
मैदानात प्रतिस्पर्धी खेळाडूबरोबर हुज्जत घातल्याप्रकरणी विराट कोहलीला यावेळी दंड ठोठावला गेला. आयसीसीने यावेळी विराट कोहलीवर मोठी कारवाई केली. त्यामुळे विराट कोहलीला आता आपल्या मानधनातून २० टक्के रक्कम हे दंडाच्या स्वरुपात द्यावी लागणार आहे. पण आयसीसीच्या कारवाईनंतर आता या गोष्टीत एक मोठा ट्विस्ट आला आहे.
विराट कोहलीबाबत कोंटास जे काही बोलला आहे, ते सर्वांनीच ऐकले आहे. पण त्यानंतर एक प्रश्न उरतो आणि तो म्हणजे, मग विराट कोहलीवर कारवाई का केली गेली. या प्रश्नाचे उत्तर आता आयसीसीला द्यावे लागेल. कारण आयसीसीने खेळाडूशी हुज्जत घातली म्हणून त्याला दंड केला आहे. पण कोंटास मात्र तसं काहीच म्हणालेला नाही.
What's Your Reaction?








