खुशखबर खुशखबर ! थेट १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त, निर्मला सीतारमन यांची सर्वात मोठी घोषणा !!
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी प्राप्तिकराबाबत मोठी घोषणा केली. आता १२ लाख रुपयांपर्यंत कोणताही कर लागणार नाही. आता देशात १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होईल तर याव्यतिरिक्त, करदात्यांना ७५,००० रुपयांच्या मानक वजावटीचा लाभ मिळेल.आर्थिक वाढ आणि लोकसंख्येच्या गरजांनुसार भारतातील आयकर दर काळानुसार बदलत असताना टॅक्स दरांमध्ये वाढ किंवा घट थेट सामान्य जनतेवर परिणाम करते म्हणून कर प्रणाली सर्व घटकांसाठी न्याय्य आहे याची खात्री करणे आवश्यक आहे.
सर्वमान्यांसाठी अर्थमंत्र्यांची आतापर्यंतची मोठी घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात (बजेट) करदात्यांसाठी मोठी घोषणा केली. आता वार्षिक १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कोणताही उत्पन्न कर (टॅक्स) भरावा लागणार नाही. त्याचवेळी, TCS मध्येही सवलत देण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांनाही प्राप्तिकराच्या मोठी सवलत मिळाला आहे. पण हा फायदा फक्त त्या करदात्यांनाच मिळेल जे नवीन कर प्रणालीनुसार आयटीआर दाखल करतील.
आपली अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी म्हटले की, १८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना ७०,००० रुपये वाचतील तर, २५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना १.१० लाख रुपये वाचतील. याशिवाय सीतारामन म्हणाल्या की, आयटीआर आणि टीडीएसची मर्यादा वाढवण्यात आली आहे. टीडीएसची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली तर टॅक्स कपातीत ज्येष्ठांसाठीही मोठी घोषणा करण्यात आली आहे.
What's Your Reaction?








