बळीराजासाठी नव्या घोषणा, उत्पादकांच्याही उंचावल्या आशा!!

Sep 23, 2024 - 08:14
 0  19
बळीराजासाठी नव्या घोषणा, उत्पादकांच्याही उंचावल्या आशा!!

सतयन, बासमती, कांद्याच्या आयात-निर्यातीवरील शुल्काबाबत केंद्र सरखाद्यतेलाच्या आयातीवर आधी कोणतेच शुल्क नव्हते. त्यावर आता २० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिफाइन्ड सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेलावर सीमाशुल्क १२.५० टक्केवरून ३२.५० टक्के केले. सोयाबीन व कापसाच्या हमीभावात खरेदी व अधिक भाव मिळावा, यासाठी कच्च्या तेलावरील ड्युटी वाढवण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. त्यांनी तातडीने निर्णय घेतला आणि सोयाबीनच्या भाववाढीने अनुकूल परिणाम दिसून आले, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले, राज्य सरकारने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यापूर्वीच्या सरकारने लोहार, सुतार, कुंभार, सोनार, मूर्तिकार, चर्मकार, मिस्त्री, न्हावी, टेलर, धोबी आदी मायक्रो ओबीसींचा विचार केला नाही. या सर्व घटकांचा विचार पंतप्रधान मोदी यांनी केला. पीएम विश्वकर्मा योजनेतून त्यांना प्रशिक्षण दिले. रोजगार वाढवण्यासाठी अर्थसहाय्य करून त्यांचे जीवनमान उंचावले, याकडेही फडणवीस यांनी यावेळी लक्ष वेधले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow