मराठा समाज पुन्हा आक्रमक, छत्रपती संभाजीनगर मध्ये ठीक- ठिकाणी केला रस्ता रोको
जिल्हा प्रतिनिधी/छत्रपती संभाजीनगर.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 24 फेब्रुवारी रोजी राज्यभर रस्ता रोको करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर छत्रपती संभाजी नगर शहरातील जळगाव मुख्य रस्त्यावर मराठा आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन केले जवळपास एक तास त्यांनी मुख्य महामार्ग अडवून ठेवला होता. त्यावेळी जवळपास दीड किलोमीटर इतकी वाहतूक वाहतूक कळंबा झाला. मात्र यातही ॲम्बुलन्स स्वर्ग रथाला मराठा समाजाने रस्ता करून देत सामाजिक बांधिलकी जपली. या आंदोलनात पहिल्यांदाच मुस्लिम नागरिक समाविष्ट झाली होती.
जळगाव रस्त्यावर आंदोलन
मराठा समाजाला सरकारने दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, हा निर्णय म्हणजे समाजाची फसवणूक असल्याचा आरोप मराठा समाजाच्या वतीने केला जातोय. त्यामुळेच शनिवारी सकाळीच 11 सुमारास छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आंदोलन करण्यात आलं. शहरातील जळगाव रस्ता, मुकुंदवाडी, धुळे, सोलापूर महामार्ग यासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आधी सरकारनं अशाच पद्धतीने वेगळा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता . मात्र, तो निर्णय न्यायालयात टिकला नाही. मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना सर्वांच्या मनात आहे, यावेळी पुन्हा एकदा सरकारने तसाच निर्णय दिला असून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात जाण्याची भाषा वापरली आहे. इतकच नाही तर, दिलेले आरक्षण टिकणार नाही, असेही त्यांनी सांगितलं. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर शंका येत असल्याने, आजचा रस्ता रोको केल्याची भावना मराठा समाजाने व्यक्त केली.
वैजापूर येथेही ठीक ठिकाणी रस्त्यावर आंदोलन
प्रशांत पाटील सदाफळ यांच्या मार्गदर्शनाखाली सकल मराठा समाज बेलगाव व सुरळा या गावातील मनोज जरांगे पाटील यांची भूमिका सगेसोयरे लागू करण्याबद्दल हा लढा उभा केला आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता सुवर्णा फाटा येथे मराठा समाज बांधवा तर्फे रस्ता रोको करण्यात आला.
तसेच वैजापूर तालुक्यातील टूणकी येथे अजय पाटील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली 11 ते 1 वाजेपर्यंत रस्ता रोको करण्यात आला. सगेसोयरे अंमलबजावणी करा अन्यथा लढा चालूच राहणार असे अजय साळुंखे म्हणाले व API मोरे शिऊर पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनादरम्यान टूणकी ते तळवाडा घाटापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अंतरवाली येथे होणार महत्त्वाची बैठक:- मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांनी 25 फेब्रुवारी रोजी अंतरवाली सराटी येथे महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची मराठा समाज आंदोलकांनी रस्ता रोको सुरू असतानी दिली. सरकार प्रत्येक वेळेस फसव्या घोषणा करत आहेत, त्यामुळे समाजाची दिशाभूल होत आहे. मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यापुढे आंदोलनाची दिशा ठरवतील. त्याचप्रमाणे सर्व समाज पुढे जाईल. त्यामुळेच रविवारी होणारी बैठक महत्त्वाची असून यात होणारी निर्णय आम्ही मान्य करू अशी भूमिका मराठा समाजाने यावेळी व्यक्त केली.
बॉक्स
सगेसोयरे अंमलबजावणी करा, अन्यथा लढा चालूच राहणार.
अजय पाटील साळुंके
बॉक्स
* सरकार कुणबी प्रमाणपत्र देत नव्हते, परंतु जरांगे पाटील यांनी लढा उभारला त्यांच्या लढ्याला यश आले व त्यांच्या लढ्यातून कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले.
* वैजापूर तालुक्यातील 1 हजार 20 नोंदी काढल्या व वैजापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना लवकरच सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
मराठा सामूनाईक मराठा समाज वैजापूर.
What's Your Reaction?






