छगन भुजबळ यांचा राजीनामा केवळ नाटक आहे
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचने विरोधात भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ठिकठिकाणी त्यांनी ओबीसी एल्गार परिषदेच आयोजन केलं असून, सरकार विरोधात घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांच्यात राजीनाम्याची मागणीला जोर धरला होता. मात्र,आपण नोव्हेंबर महिन्यातच मंत्री पदाचा राजीनामा दिल्याचं भुजबळांनी शनिवारी (3 फेब्रुवारी )ओबीसी एल्गार सभेत जाहीर केलं. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
What's Your Reaction?






